इतिहास घडवणारी माणस इतिहास विसरु शकत नाही आणि इतिहास विसराणारी माणस इतिहास घडवू शकत नाही। मराठयांचा इतिहास सुवर्ण अक्षरानी लिहून ठेवावा असा तेजस्विनी इतिहास याच मातीत घडला. मात्र साक्षर मराठे यापासून विलगच राहिले ही आमची शोकान्तिका आहे .असो.... इतिहास जाणुन घेण्यासाठी गोष्टिच्या माध्यमाने सांगायला आणि ऐकायला देखिल आवडेल अशी खात्री बाळगतो ....आणि आज तुम्हाला॥छत्रपति शिवाजी महाराजनबद्द्ल एक कथा सांगतो..
शिवछत्रपती महाराजानी जीवन भर एकच वसा पेलला तो म्हणजे माणूस जोड्न्याचा ॥मराठयानी इतिहास घडविला परन्तु मराठयानी इतिहास लिहला नाही ।शिवाजिनी स्वराज्य उभे केले ते नेमके याच्याच बलावर ... निष्ठा माणस कशाच्या मोहने शिवाजी कडे आली....विश्वास दिला राज्यानी " आपल राज्य उभा करायचा " मला छत्रपती व्हायच म्हणून नाही ....तमाम मराठयांच राज्य निर्माण करायच, रयतेच राज्य गरीबांच राज्य तयार करायच आहे..ही काळजी इथल्या माणसा -माणसा मध्ये होती .... हिरोजी इंदलकर नावाचा बांधकाम प्रमुख शिवाजी महाराज्यानकडे होता.रायगड किल्ला बांधायची जबाबदारी राज्यानी त्याच्यावर सोपावली ...शिवाजी महाराज स्वारी वर गेले...हिरोजीने किल्ला निम्यावर बांधत आणला .. आणि पैसा संपला हिरोजिला समजेणा काय करावे ..शिवाजीने तर जबाबदारी टाकली आहे . किल्ला तर पूर्ण केला पाहिजे.. तर पैसा शिल्लक नाही त्या हिरोजिने अपूर्ण काम केले.आपला राहता वाडा , आपली जमिन विकली. बायकोसह रायगडावर आला.. पैशासह जोपड़ी घेऊन राहू लागला आणि मराठयांची राजधानी बांधून काढली .....
शिवाजीना आल्यावर कळल हिरोजिने काय केले । राज्याभिषेकाच्या वेळी त्या शिवाजिना वाटल या हिरोजिंचा सत्कार करावा ॥राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजी म्हणाले, " हिरोजी राजधानीचा गड तुम्ही बांधला , बोला तुम्हाला काय हवय." त्यावेळी हिरोजी नम्रपणे मान ज़ुकवुन म्हणाला ," महाराज , उभ स्वराज्य तुम्ही पदरात टाकल .. आम्हाला आणखी काय हवय...." महाराज म्हणाले नाही काही तरी मागितलेच पाहिजे ,त्यावेळी हिरोजी म्हणाला महाराज एक विनंती आहे ..रायगडावर आम्ही जगदिशवराचे मंदिर उभारल आहे .त्या जगदिशवराच्या एका पायरीवर आमच नाव कोरायची अनुमति आम्हाला दया . महाराजाना कलेना हे कसल मागण॥पगार वाढ नाही मागितली, देशमुखी नाही मागितली, पाटीलकी नाही मागितली , वतन नाही मागितल ...मागुन मागितले तर काय दगडावर नाव कोरयची परवानगी महाराजानी विचारल हिरोंजी अस का ...????आणि हिरोंजी उत्तर देतात, " राजे..! ज्या-ज्या वेळी रायगडावर असाल,त्या- त्या वेळी जगदिशवराच्या दर्शनाला तुम्ही याल... ज्या-ज्या वेळी दर्शनाला जाल ..त्या-त्या वेळी तुमची पाऊल त्या पायारीवर पडत जातील ...आणि महाराज त्यातल्याच जर एका पायरी वर माजे नाव कोरले असेल ..तर त्या- त्या वेळी तुमच्या पाऊलाची पायधूळ म्हणजे माज्या मस्तकावर सतत अभिषेक करत राहिल.."राजे,एवढ भाग्य फक्त पदरात टाका...
छत्रपती शिवाजीराजे भोसले
अधिकारकाळ जून ६, १६७४ - एप्रिल ३, १६८०
राज्याभिषेक जून ६, १६७४
राज्यव्याप्ती पश्चिम महाराष्ट्र, कोकण,सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंतआणिउत्तर महाराष्ट्र, खानदेशापासूनदक्षिण भारतात तंजावर पर्यंत
राजधानी
रायगड
पूर्ण नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले
पदव्या गोब्राह्मणप्रतिपालक
जन्म फेब्रुवारी १९१, १६३० शिवनेरी किल्ला, पुणे
मृत्यू एप्रिल ३, १६८० रायगड
उत्तराधिकारी छत्रपती संभाजीराजे भोसले
वडील शहाजीराजे भोसले
आई जिजाबाई
पत्नी सईबाई,सोयराबाई,पुतळाबाई,काशीबाई,सकवारबाई
संतती छत्रपती संभाजीराजे भोसले,
छत्रपती राजारामराजे भोसले
राजघराणे भोसले
राजब्रीदवाक्य
'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।'
चलन होन, शिवराई (सुवर्ण होन, रुप्य होन??)
१ - जन्मदिनांकाच्या निश्चितीबद्दल मतमतांतरे आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
शिवरायांचा पाळणा:-
गुणी बाळ असा जागसि का रे वांया नीज रे नीज शिवराया अपरात्री प्रहर लोटला बाई तरि डोळा लागत नाही
हा चालतसे चाळा एकच असला तिळ उसंत नाही जिवाला निजयावयाचा हरला सर्व उपाय जागाच तरी शिवराय
चालेल जागता चटकाहा
असाच घटका घटका
कुरवाळा किंवा हटका
का कष्टविसी तुझी सांवळी काया नीज रे नीज शिवराया १ ही शांत निजे बारा मावळ थेट शिवनेरी जुन्नर पेठ त्या निजल्या ना तशाच घाटाखाली कोकणच्या चवदा ताली ये भिववाया बागुल तो बघ बाळा किति बाई काळा काळा
इकडे हे सिद्दीजवान
तो तिकडे अफझुलखान
पलिकडे मुलूख मैदान
हे आले रे तुला बाळ धराया नीज रे नीज शिवराया २
हा चालतसे चाळा एकच असला तिळ उसंत नाही जिवाला निजयावयाचा हरला सर्व उपाय जागाच तरी शिवराय
चालेल जागता चटकाहा
असाच घटका घटका
कुरवाळा किंवा हटका
का कष्टविसी तुझी सांवळी काया नीज रे नीज शिवराया १ ही शांत निजे बारा मावळ थेट शिवनेरी जुन्नर पेठ त्या निजल्या ना तशाच घाटाखाली कोकणच्या चवदा ताली ये भिववाया बागुल तो बघ बाळा किति बाई काळा काळा
इकडे हे सिद्दीजवान
तो तिकडे अफझुलखान
पलिकडे मुलूख मैदान
हे आले रे तुला बाळ धराया नीज रे नीज शिवराया २
प्रभो शिवाजीराजा
हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतीच्या साजा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
करि हिंदुराष्ट्र हें तूतें, वंदना
करि अंतःकरणज तुज, अभि-नंदना
तव चरणिं भक्तिच्या चर्ची, चंदना
गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी
जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी
जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी
ती शुद्ध हेतुची कर्मी, राहुं दे
ती बुद्धि भाबडया जीवां, लाहुं दे
ती शक्ति शोणितामाजीं, वाहुं दे
दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थे तुज ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
- स्वातंत्र्यवीर सावरकर
1 comment:
garv ahe maratha aslyacha
Post a Comment