राखी हिन्दुवानी, हिन्दुवानको तिलक राख्यो
अस्मृती पुराण राखे वेदविधि सुनी मैं
राखी रजपुती , रजधानी राखी राजन की
धरामे धर्म राख्यो , राख्यो गुन गुनी मैं
भूषण सुकवि , जीती हद्द मरह्टट्न की
देस देस कीर्ति , बरवानी तव सुनी मैं
साही के सपूत , सिवराज समशेर तेरी
दिल्ली दल दाबी कै, दिवाल राखी दुनी मैं
वेद राखे विदित , पुराण राखे सारयुत
रामनाम राख्यो , अति रसना सुघर मैं
हिन्दुन की चोटी, रोटी राखी है सिपहीन की
कान्दे मैं जनेऊ राखे , माला राखी गर मैं
मिडी राखे मुगल , मरोरी राखे पातसाह
बैरीपिसी राखे , बरदान राख्यो कर मैं
राजन की हद्द राखी , तेगबल सिवराज
देव राखे देवल , स्वधर्म राख्यो घर मैं
देवल गिराविते , फिराविते निसान अली
ऐसे डूबे रावराने , सबी गए लबकी
गौर गणपती आप , औरनको देत ताप
आपनी ही बार सब , मारी गये दबकी
पीरा पैगंबर , दिगंबर दिखाई देत
सिद्ध की सिदधाई गई , रही बात रब की
कासी की कला जाती, मथुरा मस्जिद होती
सिवाजी न होते तो , सुन्नत होती सबकी
- कविराज भूषण।
याचा अर्थ असा की हे! शहाजींचे वीर पुत्र शिवाजी महाराज! तुम्ही आपल्या तलावारीने हिंदुत्वाचे संरक्षण केले।हिन्दुंचा तिलक राखला आहे. श्रुति, स्मृति व पुराणातील आचारधर्माचे संरक्षण केले. राजपुतांचा क्षात्र धर्म व राजांच्या राजधान्यांना आपनाच स्थैर्य प्राप्त करून दिले आहे. पृथ्वीवर धर्म आपणच राखला आहे. गुणिजनांमधील श्रेष्ठ गुणांचे अस्तित्व आपल्यामुळेच राहिले आहे. आपण महाराष्ट्राची महानता वाढवली आहे व महाराष्ट्राला श्रेष्ठता प्राप्त करून दिली आहे. आपली किर्ती दिगंतात पसरलेली आहे. आपल्या दिव्या तलवारीने दिल्लीपतीच्या सेनेचा पराभव करून, जगात हिंदुंच्या मान मर्यादांचे संरक्षण केले आहे. वेदांचे आणि पुराणांचे सामर्थ्य आपल्यामुळेच टिकून राहिले आहे. आपल्यामुळेच भाविकांच्या जिभेवर रामनाम अस्तित्व शिल्लक आहे. हिंदुंच्या पवित्र शिखेला व सैनिकांच्या भाकरीला आपल्यामुळेच संरक्षण मिळाले आहे. यज्ञोपवितांना व पवित्र जपमाळांना आपण वाचाविले आहे. मोगलांच्या सामंतांचाच नव्हे, तर बादशाहचाही आपण धुव्वा उडविलात. निग्रहानुग्रहाचे सामर्थ्य आपण प्रकट केले आहे. देवळातील देव व घरामधील धर्म केवळ आपल्यामुळेच शिल्लक राहिला आहे. सभोवाताली सर्व यवनांचे कार्य अक्षुण्णपणे चालू असता व यवन सैनिकांनी मंदिरे पाडून त्या जागी अल्लाचा ध्वज फडकविला असता, राजे महाराजे भयग्रस्त व पतित होऊन तोंडदेखील बाहेर काढत नव्हते. थोडेसे पुजविधन चुकले तर भक्तांनाच ताप देणाय्रा देवी, गणपती आदि देवदेवतांना आपल्यावरील या यावनी संकटांचा प्रतिकार करणे अशक्य वाटून ते लपून बसले होते. सिद्धांची सिद्धि समाप्त होवून जिकडे तिकडे पीर, पैगंबर, फकीर, अवलिया यांचेच साम्राज्य पसरलेले होते. अशा स्थितीत जर शिवाजी महाराज झाले नसते, तर काशी कलाहीन झाली असती,मथुरेला मशीद उभा राहीली असती अणि हिन्दुंची सुन्ता झाली असती}
सौजन्य अनामिका
नमस्कार!
ReplyDeleteवा!... काय लिहिलय... वा..!
अंग अंग रोमांचिले... !!
जय भवानी - जय शिवाजी !!
चांगले लिहीले आहेस् !
ReplyDeleteतू मला विचारलं होतंस की मी वर्गवारी माझ्या ब्लोग वर् कशी केली ? या वर्ग वारीला टेग असे म्हणतात् जे पोस्ट लिहीताना तयार् करता येतात् .. पोस्ट लिहील्यावर् खालील रकान्यात् [ एक् मोकळा पांढरा चौकोन असतो त्यात् ] हवे ते शब्द लिहायचे . ते नंतर वर्गीकरण् करतात् ..